
महादेव देसाई ( १ जानेवारी १८९२ - १५ ऑगस्ट १९४२ )
माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९८३
महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक व भारताच्या स्वातंत्र्यासंग्रामातील एक लढवय्ये महादेव देसाई यांच्या स्मृतीत भारत सरकारने छापलेले ५० पैसे किमतीचे हे टपाल तिकीट.
देसाईंनी स्वातंत्र्यपुर्व काळात महात्मा गांधी संपादक असलेल्या वृत्तपत्रातून लिखाणही केले. त्यांनी अहिंसेच्या सुत्रावर तसेच महात्मा गांधींच्या सहवासातील आठवणींवर लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. १५ ऑगस्ट १९४२ साली वयाच्या ५०व्या यावर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.
No comments:
Post a Comment