Friday, August 27, 2010


सुभाषचंद्र बोस ( २३ जानेवारी १८९७ - १८ ऑगस्ट १९४५ )


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तळपता सुर्य म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस! नेताजींची छबी असलेले दैनंदिन वापरासाठी भारत सरकारने छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००१


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी व तितकेच स्फुर्तीदायक व्यक्तिमत्व. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद दोन वेळा भुषविल्यानंतर महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्य मिळवण्याच्या पद्धतीवरुन झालेल्या तात्वीक मतभेदांमुळे सुभाषबाबुंनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला व ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचा पक्ष स्थापन केला. संपुर्ण स्वराज्य व त्यासाठी गरज पडल्यास हिंसेचा मार्ग पत्करण्याची तयारी या त्यांच्या क्रांतीकारी धोरणातच त्यांचे द्रष्टेपण दिसुन येते.


दुस-या महायुद्धाच्या वेळी कोंडीत सापडलेल्या इंग्रजांना त्यांच्या शत्रुंची मदत घेउन पुरत नामोहरम कराव व देश स्वतंत्र करावा या विचारांनी प्रेरीत होवुन त्यांनी हिटलर ची भेट घेतली व जर्मनीची या प्रकरणी काही मदत होवु शकते का याची चाचपणी केली. त्यानंतर त्यांनी जपानमधील भारतीय युद्धकैद्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले व ’आझाद हिंद सेना’ उभारली. जपानी सैन्याच्या मदतीने त्यांनी अंदमान, निकोबार बेटांना इंग्रजांच्या जोखडातून मुक्त
केले. भारताच्या इशान्य सीमेवरुन मुसंडी मारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभली नाही व प्रतिकूल परिस्थीतीमुळे ही मोहीम पुर्णत्वाला जाउ शकली नाही. पण त्यांच्या "चलो दिल्ली" या घोषणेमुळे अवघ्या भारतात चैतन्य पसरले यात शंकाच नाही.

अशा या थोर लढवय्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी व गूढ अशा विमान अपघातात झाला. परंतु या विषयावर अनेक वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

माझ्या बाबतीत म्हणाल तर स्वातंत्र्यलक्ष्मीच्या चरणी आपल्या आयुष्याची ओवाळणी घालणा-या नेताजींचे नाव उच्चारताच "तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा" अशा आवेशपुर्ण गर्जना ऐकु येतात आणि मन म्हणू लागत "कदम कदम बढाए जा .. खुशी के गीत गाए जा .. ये जिंदगी है कौम की तु कौम पे लुटाए जा .."

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. विनायक देशपांडे

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.



महादेव देसाई ( १ जानेवारी १८९२ - १५ ऑगस्ट १९४२ )

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९८३

महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक व भारताच्या स्वातंत्र्यासंग्रामातील एक लढवय्ये महादेव देसाई यांच्या स्मृतीत भारत सरकारने छापलेले ५० पैसे किमतीचे हे टपाल तिकीट.

देसाईंनी स्वातंत्र्यपुर्व काळात महात्मा गांधी संपादक असलेल्या वृत्तपत्रातून लिखाणही केले. त्यांनी अहिंसेच्या सुत्रावर तसेच महात्मा गांधींच्या सहवासातील आठवणींवर लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. १५ ऑगस्ट १९४२ साली वयाच्या ५०व्या यावर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.
लाल बहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६)

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६६

'मुर्ती लहान पण किर्ती महान' अश्या शब्दांत गौरविले जाणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची छबी असलेले १५ पैसे किमतीचे हे टपाल तिकीट.

लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होण्यापुर्वी भारताच्या रेलवेमंत्री पदावर होते. ते रेलवेमंत्री पदावर असताना १९५६ साली झालेल्या एका रेलवे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी पदाचा राजीनामा देऊ केला होता. राजकारणातील नैतिक अधिष्ठान अधोरेखीत करणारी ही घटना भारतीय आजही विसरु शकलेले नाहीत.

नेहरुंच्या निधनानंतर १९६४ साली शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्या पंतप्रधान पदावरच्या लहान काराकिर्दीत त्यांना देशापुढील अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. अन्नधान्याची टंचाई तसेच पाकिस्तान बरोबरचे युद्ध ही त्यातील काही ठळक आव्हाने. त्यांनी दिलेला 'जय जवान जय किसान' हा नारा लोकप्रिय ठरला. भारताने युद्ध तर जिंकलेच शिवाय अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरलेल्या हरितक्रांतीच्या दिशेने पहिले पाउलही टाकले.

युद्ध जिंकल्यानंतर रशियातील ताश्कंद येथे युद्धबंदीच्या करारावर स्वाक्षरी केल्याच्या दुस-याच दिवशी त्यांचे निधन झाले व भारत एक सच्च्या राजकारण्याला मुकला. शास्त्रीजींच्या अकाली निधनामागे असलेले रहस्य अजुनही उलगडलेले नाही.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

जेरोम डीसूजा ( ६ ऑगस्ट १८९७ - १२ ऑगस्ट १९७७ )


जेरोम डीसूजा यांच्या जन्मशताब्दीनिमीत्त भारत सरकारने छापलेले २ रुपये किंमतीचे हे टपाल तिकीट.


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९७

जेरोम डिसुजा हे भारतातील एक विख्यात ख्रिस्ती ’बिशप’. त्याचबरोबर एक विद्वान व लेखक म्हणुनही प्रसिद्ध. भारतीय चर्चवरील ’बिशप’ नेमणूकीत पोर्तुगलला असणा-या अधिकाराबद्दल व्हॅटीकनबरोबरच्या वाटाघाटींमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर भारतातील फ्रेंच वसाहतिंच्या शांततामय माघारीतही त्यांनी केलेल्या वाटाघाटींचा मोलाचा वाटा होता. युनोच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत भारताचे प्रतिनिधी म्हणून जेरोम डिसुझांची नियुक्ती करण्यात आली होती.


टीप : ब्लॉगवाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले, तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Thursday, August 26, 2010



महात्मा गांधी ( २ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८ )

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची छबी असलेले भारत सरकारने दैनंदिन वापरासाठी छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९१

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Monday, August 16, 2010

जे.आर.डी. टाटा ( २९ जुलै १९०४ - २९ नोव्हेंबर १९९३ )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील १५ रुपये किमतीचे जे.आर.डी. टाटा यांची छबी असलेले हे तिकीट.
जे.आर.डी. टाटा म्हणजेच जहांगीर टाटा भारतातील नागरी उड्डयन क्षेत्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी , ’टाटा एअरलाईन्स’ या भारतातील पहिल्या व्यावसायीक विमान सेवेची सुरुवात १९३२ साली करण्यात आली. १९४६ साली ह्या ’टाटा एअरलाईन्स’ चे आत्ताच्या ’इंडीयन एअरलाईन्स’ मध्ये रुपांतर करण्यात आले!

पोलाद, अभियांत्रीकी, उर्जा, रसायने या क्षेत्रातील अनेक उद्योगांमध्ये अग्रणी असलेल्या व भारताच्या आर्थीक विकासात मोलाची भुमिका बजावणा-या ’टाटा ग्रूप’ चे प्रमुख या नात्याने जे.आर.डींचे योगदान अतुलनीय आहे.
त्यांना भारत सरकारने १९५७ साली पद्मविभुषण पुरस्काराने तर १९९२ साली भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ’भारतरत्न’ ने गौरवले.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, August 7, 2010


मदर टेरेसा ( २६ ऑगस्ट १९१० - ५ सप्टेंबर १९९७ )

मदर टेरेसा यांची छ्बी असलेले ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदिन वापराच्या टपाल तिकीट मालिकेतील हे २० रुपये किमतीचे टपाल तिकीट.

मदर टेरेसा या एक अल्बानियन वंशाच्या परंतु भारताचे नागरिकत्व पत्करलेल्या थोर समाजसेविका. गरिब, निराधार आणि अनाथांसाठी त्यांनी चालवलेल्या कार्याची महती संपुर्ण जगभर पसरली. १९७९ साली त्यांना ’नोबेल शांतता पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले. १९८० साली त्यांना भारत सरकारने ’भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले. त्यांनी कलकत्त्यात स्थापन केलेल्या ’मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेच्या आजघडीला १२३ देशांमध्ये शाखा असुन मदर टेरेसांनी घालून दिलेला मानवतावादाचा वसा त्या चालवत आहेत.

२०१० साली त्यांची जन्मशताब्दी असुन अमेरिकन टपाल खाते देखील त्यांची छबी असलेले टपाल तिकीट प्रकाशीत करणार आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Tuesday, August 3, 2010


होमी जहांगीर भाभा ( ३० ऑक्टोबर १९०९ - २४ जानेवारी १९६६ )

भारताच्या आण्वीक कार्यक्रमाचे पितामह होमी जहांगीर भाभा यांची छबी असलेले हे ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदिन वापराच्या टपाल तिकीट मालिकेतील ४ रुपये किमतीचे तिकीट.

टी.आय.एफ.आर. (टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च ) या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक असलेले होमी भाभा अणुउर्जेच्या शांततामय वापरासाठी आग्रही होते. या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहे. भाभांचे नाव देउन गौरवली गेलेली ’भाभा अ‍ॅटॉमीक रिसर्च सेंटर’ ही संस्था अणुउर्जेच्या क्षेत्रात भरीव योगदान देते आहे.

होमी भाभांना भारत सरकारने १९५४ साली पद्मभुषण ह्या पुरस्काराने गौरवले. अशा या महान वैन्यानीकाचा १९६६ साली एका विमान अपघातात मृत्यु झाला.

ऋणनिर्देश
हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. सेल्वाराज मणी
२. श्री. चंद्रशेखर भिडे

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.