Friday, August 27, 2010

लाल बहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६)

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६६

'मुर्ती लहान पण किर्ती महान' अश्या शब्दांत गौरविले जाणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची छबी असलेले १५ पैसे किमतीचे हे टपाल तिकीट.

लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होण्यापुर्वी भारताच्या रेलवेमंत्री पदावर होते. ते रेलवेमंत्री पदावर असताना १९५६ साली झालेल्या एका रेलवे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी पदाचा राजीनामा देऊ केला होता. राजकारणातील नैतिक अधिष्ठान अधोरेखीत करणारी ही घटना भारतीय आजही विसरु शकलेले नाहीत.

नेहरुंच्या निधनानंतर १९६४ साली शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्या पंतप्रधान पदावरच्या लहान काराकिर्दीत त्यांना देशापुढील अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. अन्नधान्याची टंचाई तसेच पाकिस्तान बरोबरचे युद्ध ही त्यातील काही ठळक आव्हाने. त्यांनी दिलेला 'जय जवान जय किसान' हा नारा लोकप्रिय ठरला. भारताने युद्ध तर जिंकलेच शिवाय अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरलेल्या हरितक्रांतीच्या दिशेने पहिले पाउलही टाकले.

युद्ध जिंकल्यानंतर रशियातील ताश्कंद येथे युद्धबंदीच्या करारावर स्वाक्षरी केल्याच्या दुस-याच दिवशी त्यांचे निधन झाले व भारत एक सच्च्या राजकारण्याला मुकला. शास्त्रीजींच्या अकाली निधनामागे असलेले रहस्य अजुनही उलगडलेले नाही.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

No comments:

Post a Comment